विरार, अलिबाग (मेट्रो) कॉरिडॉरसाठी योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा!
प्रतिनिधी - दिपक लोके ( पेण )
पेण – विरार अलिबाग मेट्रो कॉरीडॉर रोड करिता शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी बलवली गाव शेतकरी संघर्ष समिती पेण, यांनी निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला आहे. मौजे बलवली गावाच्या हद्दीतील शेतजमीन अलिबाग मेट्रो कॉरिडॉरच्या उद्देशाने शासनाकडून संपादित करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने भूसंपादनाची भरपाई अत्यंत तुटपुंजी जाहीर केली आहे. आमच्या दुबार पीक शेतजमिनीसाठी सरकारने जाहीर केलेली किंमत खूपच कमी आहे. भारत सरकार कृषी विकासाला अधिक चालना देत आहे. तथापि, 2020 मध्ये राष्ट्रीय महामार्गाने अधिग्रहित केलेल्या बलवली गावातील प्रति एकर जमिनीसाठी शासनाने रु. तथापि, भाव कमी करणे किंवा होणे हे व्यावहारिक नाही आणि ते पूर्णपणे चुकीचे आणि बेकायदेशीर तसेच शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. तसेच अलिबाग मेट्रो कॉरिडॉर प्रकल्पात विरारला सर्वाधिक फटका बसला आहे. ह्या प्रकल्पामुळे भविष्यात पिढ्यानपिढ्या राहात असणाऱ्या आमच्या गावाचे पुर परिस्थितीमुळे आस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी आम्ही शासनाच्या विकास कामात अडथळा निर्माण करत नाही. आमची जमीन कायमची संपादीत होणार आहे. त्यामुळे आम्ही भविष्यात शेतकरी राहणार नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने आमचे गावातील शेतजमिनींना प्रतिगुंठा कमितकमी ३५,००,०००/- (अक्षरी पस्तीस लाख मात्र) एवढा भाव जाहीर करावा.
प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्यात यावा तसेच आमचे कुटुंबाचे उपजिविकेचे साधन कायमचे नष्ट होत असल्यामुळे त्या मार्गिकेमध्ये कायमस्वरुपाची नोकरी तसेच व्यवसायासाठी लेखी स्वरुपात हमी दयावी. प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादीत होत आहे त्या शेतकऱ्याला त्या जमिनीच्या बदल्यात १२.५ टक्के सुपिक विकसीत भुखंड १ किमी च्या अंतरावर देण्यात यावे. आमच्या गावातील आमच्या वहिवाटीस असणारे व पारंपारीक पध्दतीचे रस्ते, नाले, पावसाळी पाण्याचे ओढे नाहीसे होणार नाहीत याबाबत आम्हाला लेखी स्वरुपात दयावे.
शासनाने आमच्या मागण्या मान्य करुन त्याप्रमाणे पुढील १५ दिवसांमध्ये वाढीव भाव जाहीर करावा. अन्यथा आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आमच्या मागण्या मान्य होई पर्यंत लाक्षणीक उपोषणास बसणार आहोत. सदरचे लाक्षणिक उपोषण हे आम्ही मा. भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पेण यांचे कार्यालया समोरील प्रांगणात शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ उपोषणास बसणार असल्याचे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंगल पाटील यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने बलवली गावचे ग्रामस्थ हजर होते.