Join WhatsApp Group
राजकीय

जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रितम म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज ; पदाधिकारी कार्यकर्त्यानी केला एकच जल्लोष.

प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जासई येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. उरण विधानसभा मतदारसंघातून महावीकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून वरिष्ठांच्या आदेशाने शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रितम म्हात्रे यांनी अर्ज भरला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निवडणूक अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

उरण तालुक्यातील जासई येथे दि. बा.पाटील हायस्कूल जवळ मोकळ्या मैदानात शेतकरी कामगार पक्षाची भव्य दिव्य अशी सभा झाली. या सभेत विविध मान्यवरांची भाषणे झाली. विविध मान्यवरांनी भाषण केल्यानंतर सर्वात शेवटी उरण विधानसभा मतदार संघांचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी उरण विधानसभा मतदार संघातील विविध समस्या, प्रश्नावर प्रकाश टाकला. तसेच आजही उरण विधानसभा मतदार संघात अनेक प्रश्न, समस्या प्रलंबित असल्याचे सांगत भाजपचे महेश बालदी यांच्यावर घणाघाती टीका केली. “लोकांना रोजगार नाही, पिण्याची पाणी उपलब्ध नाही, चांगले रस्ते नाही. वेगवेगळ्या सेवा सुविधा पासून जनता वंचित आहेत. महेश बालदी यांनी कोणताही विकास केला नाही. त्यामुळे जनता विकासापासून वंचित आहे. मला आमदार जनतेची प्रामाणिक सेवा करण्यासाठी बनायचे आहे. प्रामाणिक व चांगले काम करून जनतेचे आशीर्वाद पाहिजे. म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. मला तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाहिजे. मला विकासासाठी, बेरोजगार कमी करण्यासाठी व उरणच्या विकासासाठी बहुमताने निवडून दया ” असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून केले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, जेष्ठ नेते काका पाटील, माजी सभापती नरेश घरत, उरण तालुका चिटणीस विकास नाईक, उरण विधानसभा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष सीमा घरत, शहर अध्यक्ष शेखर पाटील, शहर युवा अध्यक्ष कुंदन पाटील, माजी नगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये